आमलकी एकादशी माहात्म्य
श्रीगणेशाय नमः ।। एकदा मांधाता राजा । वसिष्ठ गेले भेटण्यासी। तैं करुनी उत्तम स्वागतासी । नृपे तयांसी तोषविले ।।१ ।। मग अत्यंत नम्रतेने । क्षेमकुशल पुसिले त्याने । म्हणाला श्रेष्ठा आपुले येणे । हाच अनुग्रह मजवरी ।।२।। हे महाबाहो विधिसुता । हे क्रषिवर्या कृपावंता। एक आस माझिया चित्ता । कृपा करुनी पुरवावी ।।३।। मम कल्याणास्तव खचित । सांगा एखादे श्रेष्ठ व्रत । त्याचे रहस्य पूर्ववृत्त । तेही कळावे मजलागी ।४।॥ वसिष्ठ म्हणाले नरश्रेष्ठा। एक महाव्रत सांगतो आता । तरी एकाग्र करुनी चित्ता। श्रवण करी आदरे।।५।। आमलकी एकादशी व्रत। महाफलदायी अतिप्रख्यात । सहस्र गोदानांचे या निश्चित । पुण्य लाभते आचरणे ।।६।। व्रत असे हे पापनाशक । तैसेच परम मोक्षदायक । त्याचा इतिहास, कथानक। ऐक सांगतो तुजलागी ।।७ ॥ सहजगत्या व्रत घडले । तेच पुण्य फळास आले । एका व्याधाचे दैव फिरले । अंती मिळाली मोक्षगती ॥८॥ कथा सुरम्य त्याविषयीची। प्रेरणा जाहली सांगण्याची । प्रजा ‘वैदिश’ नगरीची । होती सुखी आनंदित ।।९।। शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । निजकर्मांत रममाण । पुष्ट निरोगी अवघे जन नास्तिक ना कुणी पातकी ॥१० ॥। अशा त्या पुण्यनगरीचा । राजा सोमवंशी साचा । पुत्र शशबिंदूचा । नाम होते चैत्ररथ ।।११।। तो सुव्रती धर्मवान । बल सहस्र गजांसमान । शस्त्रविद्येत अति निपुण । शास्त्रार्थही जाणतसे ।।१२।। सत्यप्रतिज्ञ प्रजापालक। राज्यही ॐ होते निष्कंटक । दुष्काळ अथवा रोग भयानक । नच येती संकटे ।। १ ३ ।। आनंद उत्साह असे सतत। वेदघोष घुमती नगरीत । सौख्य सुकाळ वसे तेथ । नव्हती कृपणता दारिद्रय ।। १४।। पूर राजासवे पौर समस्त । विष्णुभक्तीत नित्य रत। पूजन अर्चन सदोदित । चालतसे राउळी ।। १५।। शुक्ल कृष्ण एकादशीस । प्रत्येकाचा असे उपवास । त्या दिनी त्यजुनी कट काम्यधर्मास । जो तो भक्तीच करीतसे।। १६ ।। अशी बरीच वर्षे गेली । पुढती एक घटना घडली। आमलकी एकादशी आली । फाल्गुन शुक्ल पक्षाची॥१७॥ तिथी महाफलदायी म. म्हणुनी। केले उपोषण सकलांनी। राजानेही त्या दिनी। सरितास्नान केले पां |॥१८। होउनिया शुचिर्भूत । गेला जनांसह राउळात । पूर्णकुंभ स्थापुनी लाविले छत्र । पादुकाही ठेविल्या ।। १९ ।। मग पंचरत्ने घालुनी। केले सुगंधित द्रव्यांनी। त्यावरी परशुराम मूर्ती ठेवुनी। दीपमाळाही लाविल्या ।।२०।। तदनंतर त्या महीपतीने । क्षिजनांसह आनंदाने । पूजा केली भक्तिभावाने । परशुरामासवे आवळीची ।।२१।। हात जोडुनी केली प्रार्थना । तोषविण्या तो करीत स्तवना । बोलला हे जमदग्निनंदना । वंदन माझे स्वीकारी।।२२।। हे रेणुकाआनंदवर्धना। हे भुक्तिमुक्तिप्रदायना। हे कृपाळू दयाघना । वंदन माझे स्वीकारी ।।२३।। आमलकीची शीतल छाया । तुझ्यावरी केली सदया । मनोभावे पडतो पाया। वंदन माझे स्वीकारी ।।२४।। मग आवळीते संबोधून । म्हणाला माते तुलाही वंदन । अर्घ्योदक जे करितो अर्पण । ते स्वीकारी प्रेमाने ।।२५।। विधीपासुनी तव उत्पत्ती । दर्शने महापापे जळती। सामर्थ्य वर्णिता मम मती । कुंठित होय सर्वथा ।।२६।। तू साक्षात ब्रह्मरूपिणी। श्रीराम धन्य तुजसी पूजुनी। प्रसन्न होउनी प्रदक्षिणांनी। नष्ट करी मम पातके ।।२७।। अशा प्रकारे त्या स्थानी । राजासमवेत सर्वांनी । पूजन अर्चन करुनी । केले जागरण भक्तीने ।।२८।। साधारण त्याच अवधीत । एक पारधी आला तेथ। जीवहिंसा करुनी सतत । परिवाराते पोशितसे।|२९|| तेणे बहिष्कृत सर्वधर्मातूंन । असा व्याध तो अति दमून । मा क्षुधातृषेने व्याकूळ होऊन । विश्रांतीस्तव पातला ।।३०।। दीपमाळांचा चकचकाट । पाहुनी तयासी वाटली गंमत । मौज बघाया थांबला तेथ । होता क्षुधातुर जरी ।।३१।। जागरण करीत जनमेळा । पाहुनी अचंबित त्या समयाला। हा काय प्रकार चालला । विचार करी मानसी ।।३२।। सहजगत्या दूरवरून । एक कुंभ आला दिसून । त्यावरील दामोदरमूर्ती छान । ॐ तीही देखिली त्या वेळी ।।३३।। उत्सव-दर्शने रमून गेला। आवळीचाही वृक्ष पाहिला । विष्णुकथाही त्या समयाला । मनःपूर्वक ऐकली ।।३४।। भूक लागली कडकडून । तरी ऐकले एकादशी महिम्न । जनांसवे जागरण । केले रात्रसमयासी ।।३५|॥ प्रभातीसी अवघे जन । गेले आपुल्या स्थानी निघून । व्याधही मनी संतोषून । निजगृही परतला ।।३६ ।। आनंदाने भोजन केले। तेणे तयासी पुण्य मिळाले । त्याचे काय फळ लाभले । तेच आता सांगतो ।।३७ ॥Mआमलकी एकादशी दिनी। केले उपोषण जागरण म्हणुनी । त्या पुण्याने अन्य जीवनी। भाग्य उजळले तयाचे ।। ३८।। जयंती नामक नगरीत । नृप विदुरथ राज्य सं पू करीत । व्याध जाहला त्याचा सुत । वसुरथ नावाचा ।।३९।। जन्म राजघराण्यात । महाराज्य र्ण झाले प्राप्त । दश सहस्र संख्येत । गावे होती त्यामाजी ।॥४०।। धनधान्यसमृद्धीसहित । चतुरंग ए सेना बलवंत । निर्भय राज्य उपभोगीत । श्रीहरीच्या कृपेने ।।४१।। त्या राजाची देहाकृती। द पिळदार बलदंड होती। चंद्रासमान अंगकांती। तेजे आदित्य वाटतसे ।।४२।। तो धार्मिक थी सत्यवचनी । विष्णुभक्ती अंतःकरणी। महापराक्रमी तरीही मनी । क्षमाशीलता मा हा वसतसे ।।४३।। होता वेदज्ञ कर्मनिष्ठ । यज्ञ करितसे विधियुक्त। निरालस्य प्रजापालनात । – शत्रू हतबल त्यापुढती।।४४।। भूमी द्रव्यादी दाने देऊन । तुष्ट करितसे विप्रगण । जनहितास्तव नित्य कष्टून । सुखी ठेवी सकलांना ।।४५।। ऐसा नृप तो गुणवंत । एकदा मृगयेस गेला वनात । प्रारब्धवश चुकला वाट । श्वापदामागे पळताना ।।४६।। तयासी इतकी भूल पडली। की दिशाही कळेना त्या वेळी। राजा असुनी अतुर्बळी। वनांतरी भटकला।।४७।। त्या श्रमांनी थकून गेला। क्षुधातृषेने व्याकूळ झाला। विश्रांतीस्तव त्या समयाला । पहुडला वृक्षतळी ।।४८।। शत्रुंजय तो वसुरथ । घोर काननी निद्रिस्त । असता अचानक आले तेथ । म्लेंच्छ पहाडी क्रूरात्मे ।।४९।। याच यवनांसी पूर्वकाळी। युद्धप्रसंगी माती चारली। घोर शिक्षा करुनी त्या वेळी । होते पळविले नृपवरे ।।५० ।। तो महावैरी वसुरथ। आयताच सापडला तावडीत। तेणे म्लेंच्छ आनंदित । वेढा घातला त्यालागी।।५१ ।। तै एक म्हणाला या शत्रूला। धाडा तत्काळ यमसदनाला । यानेच निघ्घृण वध केला। आमच्या आप्त स्वजनांचा ।॥५२ ।। पिते चुलते मामे भाचे । बंधू नातू मारिले साचे । माप याच्या पापांचे । घाला याच्याच पदरात ।।५३।। आमच्या कुळाचा निःपात केला। लाविले आम्हां देशोधडीला। आज बरा एकटा सापडला। करा शासन लवलाही ।।५४।। केले भाषण संतापून । तेणे द्वेष उफाळून । झणी शस्त्रे उगारून वसुरथावरी धावले ।।५५।। पाश पट्टीश तलवारी । बाण मारिले कितीतरी। तथापि नृप देहावरी । क्षतही ते नच उठले ।।५६। । त्यांनी जे-जे प्रयत्न केले। ते-ते सर्वही व्यर्थ गेले । त्या नवलाने म्लेंच्छ सगळे । झाले भयभीत अतिशय ।।५७ । ती अवस्था अतिबिकट । त्राणच नुरले गात्रांत। स्थानी उभे असमर्थ । निर्जीव चेतनाहीन ते ।।५८ । । वसुरथासी माराया आले। परी स्वतःच दीन झाले । जीव वाचविण्या भले । टाकवेना पाऊलही।।५९ ।। इतुक्यात नृपदेहातून । एक सुंदरी झाली उत्पन्न । म्लेंच्छ पाहती थक्क होऊन । परी उमजेना प्रकार तो ।।६०।। दिव्य वस्त्रालंकार भूषित। पुष्पमाळा तिच्या कंठात। तनू उत्तम सुगंधित । परी संताप मुखावरी ।।६१ ।। भ्रूकुटी वक्र अत्यंत । युद्धसज्ज चक्र हातात । लालबुंद डोळ्यांत । जणू अग्नीच प्रकटला ।।६२ ।। तिच्या दर्शने यवनांप्रत । वाटले पातली काळरात। मनी दाटले दुःख अत्यंत । आरंबळती प्राणभये ।।६३।। तेवढ्यात त्या महामायेने। केले आक्रमण वेगाने । चक्र सोडुनी त्वेषाने । ठार मारिले तयांते ।।६४ ।। यवन कलेवरे कोसळली। तोच नृपाते जाग आली । दृश्य पाहुनी त्या वेळी । हर्षमुग्ध जाहला ।।६५।। मनी म्हणे हे कृत्य अद्भुत। मेले यवन वैरी समस्त । कोण हितकतर्ता अप्रकट । रक्षायाते धावला ।।६६।। ण विस्मयचकित अंतःकरणी। सतत एकच प्रश्न मनी। या दुष्टांते येथ कोणी । मारियले नच ए कळे ।।६७।। तोच झाली आकाशवाणी । नृपा गोष्ट तू घे ध्यानी। एका केशवाशिवाय का कोणी। रक्षण ऐसे करील का ।।६८।। ते ऐकुनी भाव दाटले । आनंदाश्रू नयनी आले । कृतज्ञतेने हात जुळले । आदरे वंदन करीतसे ।।६९।। मग दुर्गम वनातुनी। सुखरूप गाठली राजधानी । पुढती धर्मबुद्धी ठेवुनी। राज्य केले पृथ्वीचे ।७०।। कथानकाच्या शेवटी । वसिष्ठ वदले मांधात्याप्रती। राजा तुवा घ्यावा चित्ती । तिथिमहिमा अलौकिक ।।७१। ॥। भूलोकी जे नरश्रेष्ठ। आचरती आमलकी व्रत । ते होउनी भाग्यवंत । जाती अंती वैकुंठी । ।७२।।
॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे फाल्गुनशुक्लैकादश्याः आमलकीनाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।।
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
शुभं भवतु !
आमलकी एकादशी दिवशी काय करू नये?
Leave a Reply