राखी पौर्णिमा/रक्षाबंधन मुहूर्त व माहिती…

ज्योतिष आकाश पुराणिक
माझ्याकडून सर्व बहिण आणि भाऊ यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा…

दिनांक २१-०८-२०२१ रोजी रविवार रक्षाबंधन
संध्याकाळी ०५:३२ मी. पौर्णिमा समाप्त होते आहे

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा हा सण आहे. राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.

या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे या पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात.

कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

राखी बंधन हे मनगटावर का बांधतात
:- शास्त्रनुसार पुरुषाच्या उजव्या हाताच्या मनगटावर सुर्यनाडी व स्त्रीच्या डाव्या हाताच्या मनगटावर चंद्रनाडी असते या सोबत मनगटावर असणाऱ्या तीन मानिबंध कंकन रेखा ही असतात या रेखा
शास्त्रनुसार पुरूषाला १२० वर्षे व स्त्रीला १०८ वर्ष आयुष्य असते हे आयुष्य वाढावे व रक्षणासाठी होण्यासाठी हे रक्षाबंधन करतात

श्री रक्षाबंधन करताना हा मंत्र उच्चारण करा

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: |
तेन त्वां रक्षबन्धामि रक्षे मा चल मा चल ||

श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस ‘रक्षाबंधन’ या नावाने प्रसिद्ध असून हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. या पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

कथा
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नेसल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी. राखी बांधताना बहिणीने म्हणावे- येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होत तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे.) राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करते. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन घेणे. रक्षाबंधन म्हणजे केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी असते . रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांनासुद्धा राखी बांधते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन हीच यामागची भावना आहे. रजपूत लोक शूर, कडवे म्हणून विशेष प्रसिद्ध. कडवे म्हणजे शब्दास जागणारे आहेत. फार पूर्वी राजपूत काळात त्यांची साम्राज्ये होती. त्या वेळेपासून हा सण साजरा केला जात आहे. स्त्रिया आपला पती, भाऊ यांच्या मनगटास राखी बांधतात. राखी म्हणजे दोऱ्याचे बंधन. ही राखी स्त्रिया कलाकुसरीने आकर्षक बनवतात. दोऱ्याचे बंधन घालून स्त्रिया आपली, आपल्या अब्रूचे रक्षण करण्याची जबाबदारी, बंधन तुमच्यावर आहे, असे त्या पुरुषास- भावास सांगतात. त्यामुळे त्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली, तिच्या रक्षणार्थप्रसंगी प्राण द्यायचे ही राजपुतांची नीती होती. याची बरीच उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे, तर चितोडवर जेव्हा बहादूरशहाने हल्ला केला, त्या वेळी राणी कर्णावतीने बाबरचा पुत्र हुमायूनला राखी भेट पाठवून आपले व आपल्या राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. हुमायूनने देखील जाती-धर्म याचा विचार न करता चितोडचे रक्षण केले. राखी पोर्णिमेसच “श्रावणी ” असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे “श्रावणी’ साजरी करणे होय. श्रावण नक्षत्रावर श्रावणी करतात. “राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ धर्माचे रक्षण करणे हाच आहे. पूर्वीपासून सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई, ती आजही होतेच आहे. या मनाच्या खेळात आपला शाश्‍वत पाठीराखा कोणी असावाच, ही भावना मग भावाजवळ येऊन थांबते, ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतच. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते. याला इतिहास साक्ष देतो जात-धर्म-पंथाला छेद देत हे आपल्याला ज्ञात आहेच. हे संदर्भ लक्षात घेऊन “राखी’ बांधली तर तो आजन्म कृष्णासारखा होतो. म्हणूनच दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भ, संस्कार महत्त्वाचा, हेच या दिवसाचे माहात्म्य आहे.

ज्योतिष आकाश पुराणिक

आपल्या राशी प्रमाणे त्या त्या रंगाची राखी बांधल्यास भावास होणार अक्षय फायदे.

मेष : लाल रंगाची राखी भावास सकारात्मक ऊर्जा मिळेल.

वृषभ : सफेद रंगाची राखी भावास मानसिक शांती मिळेल.

मिथुन : हिरव्या रंगाची राखी भावाची वैचारिक शक्ती वाढेल.

कर्क : चमकदार सफेद रंगाची राखी भावाशी भावनात्मक नाते मजबूत करील.

सिंह : सोनेरी वा गुलाबी रंगाची राखी भावास नेतृत्व प्रदान करील.

कन्या : हिरव्या रंगाची राखी भावास शुभ परीणाम मिळतील.

तुळा : सफेद रंगाची राखी भावास न्याय करण्याची शक्ती प्रदान करील.

वृश्चिक: चांदिची राखी भावास मनःशांती व रोग मुक्ती मिळेल.

धनु : नारंगी रंगाची राखी भावाची अध्यात्मक रुची वाढेल.

मकर : निळ्या रंगाची राखी भावास कार्यांत यशस्वी करील.

कुंभ : निळ्या रंगाची राखी भावाचे मनोबल वाढवते.

मीन : सोनेरी रंगाची राखी भावास मानसिक शांति मिळते.

बहीण नसल्यास मित्रांची बहीण वा ब्राह्मणा कडून राखी बांधून घेणे. भाऊ नसल्यास भगवान श्रीकृष्णास राखी बांधणे.

ज्योतिष राहुल नारायणराव पुराणिक
ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक
९८२३३१६१७९
जालना

 

Leave a Reply

Your email address will not be published.